افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم.
#66383[صحيح]
HadeethEnc · 1.24.0

नबी ﷺ म्हणाले: "लवकरच फितनांचा (गोंधळ आणि परीक्षा यांचा) काळ येईल. सावधान! त्या काळात असा फितना येईल की जो त्यात बसून राहील तो चालणाऱ्यापेक्षा चांगला असेल, आणि जो चालत असेल तो त्याकडे धावणाऱ्यापेक्षा चांगला असेल

Available translations

Choose an available translation of this Hadeeth

01

Hadeeth text

उथमान अश्-शह्हाम म्हणतात:
मी आणि फरकद सबखी, मुस्लिम इब्न अबी बकऱा यांच्या शेतात त्यांच्या भेटीस गेलो.
आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि विचारले:
"तुम्ही तुमच्या वडिलांकडून फितनांविषयी (परीक्षा, गोंधळाच्या काळाबद्दल) काही हदीस ऐकली आहे का?"
ते म्हणाले: "होय, मी माझे वडील अबू बकऱा (र.अ.) यांना ऐकले आहे की ते सांगत होते — रसूलुल्लाह ﷺ म्हणाले:" नबी ﷺ म्हणाले:
"लवकरच फितनांचा (गोंधळ आणि परीक्षा यांचा) काळ येईल.
सावधान! त्या काळात असा फितना येईल की जो त्यात बसून राहील तो चालणाऱ्यापेक्षा चांगला असेल,
आणि जो चालत असेल तो त्याकडे धावणाऱ्यापेक्षा चांगला असेल.
म्हणून जेव्हा तो फितना प्रकट होईल किंवा घडून येईल,
तेव्हा ज्याच्याकडे उंट असतील त्याने आपल्या उंटांकडे जावे,
ज्याच्याकडे मेंढ्या असतील त्याने आपल्या मेंढ्यांकडे जावे,
आणि ज्याच्याकडे जमीन असेल त्याने आपल्या जमिनीकडे परत जावे."

एका माणसाने विचारले: "अल्लाहचे रसूल ﷺ, जर एखाद्याकडे ना उंट असतील, ना मेंढ्या, ना जमीन — तर तो काय करावा?"
आपण ﷺ म्हणालात:
"तो आपली तलवार घ्यावी आणि तिच्या धारेवर दगडाने मारा करून ती बोथट करावी,
आणि जर सुटका मिळू शकत असेल तर सुटून जावे.
हे अल्लाह! मी संदेश पोचवला का? हे अल्लाह! मी पोचवला का? हे अल्लाह! मी पोचवला का?"

मग एका व्यक्तीने विचारले: "अल्लाहचे रसूल ﷺ, जर मला जबरदस्तीने एका फौजेसोबत किंवा गटासोबत नेले गेले,
आणि एखाद्याने मला तलवारीने मारले, किंवा एखादा बाण येऊन मला लागला — तर काय होईल?"
आपण ﷺ म्हणालात:
"तो माणूस आपल्या पापांसह तुझे पापही वाहून नेईल,
आणि तो नरकवासीयांपैकी एक असेल."
02

Explanation

उथमान अश्-शह्हाम आणि फरकद अस्-सबखी यांनी सहाबी अबू बकऱा (र.अ.) यांचे पुत्र मुस्लिम यांना विचारले:
"तुम्ही तुमच्या वडिलांकडून नबी ﷺ यांच्याकडून मुसलमानांमधील फितना आणि युद्धांबद्दल काही हदीस ऐकली आहे का?"
ते म्हणाले: "होय, नबी ﷺ यांनी सांगितले होते की त्यांच्या निधनानंतर फितनांचा काळ येईल.
आणि त्या फितनांमध्ये जो बसून राहील आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करील तो त्या व्यक्तीपेक्षा चांगला आहे जो त्यात चालत आहे पण त्यांचा शोध घेत नाही.
आणि जो त्यात चालत आहे तो त्या व्यक्तीपेक्षा चांगला आहे जो त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांचा शोध घेतो आणि त्यात सहभागी होतो." नंतर नबी ﷺ यांनी त्या काळातील लोकांना मार्गदर्शन केले की जेव्हा फितना त्यांच्या काळात उघड होईल आणि त्यांच्याकडे कुठली तरी सुरक्षित जागा असेल तर त्यांनी तिथे जावे.

ज्याच्याकडे उंट असतील तो आपल्या उंटांकडे जावा.

ज्याच्याकडे मेंढ्या असतील तो आपल्या मेंढ्यांकडे जावा.

ज्याच्याकडे जमीन किंवा शेत असेल तो आपल्या जमिनीकडे जावा. एका व्यक्तीने विचारले: "अल्लाहचे रसूल ﷺ, जर एखाद्याकडे ना उंट असतील, ना मेंढ्या, ना जमीन — तर तो काय करावा?" नबी ﷺ म्हणाले:
"तो आपल्या तलवारीकडे जाईल, तिला मोडेल आणि निष्क्रिय करेल, आणि नंतर जर शक्य असेल तर स्वतः आणि आपल्या कुटुंबाची सुटका करत पलायन करेल." नंतर नबी ﷺ यांनी तीन वेळा साक्ष दिली आणि म्हटले:
"हे अल्लाह! मी संदेश पोहचवलाय का? हे अल्लाह! मी पोहचवलंय का? हे अल्लाह! मी पोहचवलंय का?" एका व्यक्तीने विचारले: "अल्लाहचे रसूल ﷺ, जर मला जबरदस्तीने एका फौजेसोबत किंवा गटासोबत सामील केले गेले, आणि एखाद्याने तलवारीने मारले किंवा एखादा बाण येऊन मला ठार मारला — तर काय होईल?" नबी ﷺ म्हणाले:
"असा माणूस स्वतःच्या पापांसह त्याच्या मारलेल्या व्यक्तीच्या पापांसाठीही जबाबदार असेल, आणि महाप्रलयाच्या दिवशी तो नरकवासीयांमध्ये गणला जाईल."
03

Benefits

फितनांचा उल्लेख लोकांना सावध करण्यासाठी केला जातो, जेणेकरून ते त्यासाठी तयार राहतील, त्यात सामील होणार नाहीत, आणि अल्लाहकडे धैर्य व त्यांच्या वाईटापासून सुटका मागतील.
अन-नववी (रहिमहुल्लाह) म्हणतात: नबी ﷺ यांचे हे वचन: "जो बसून राहील तो चालणाऱ्यापेक्षा चांगला आहे" आणि त्यानंतरचे वर्णन याचा अर्थ असा आहे की फितना किती धोकादायक आहे, लोकांना त्यापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन केले आहे आणि त्यातून सुटका मिळवण्याची सूचना दिली आहे. तसेच त्याची तीव्रता आणि वाईटपणा यावर अवलंबून असेल की कोण त्याच्याशी किती जोडला आहे.
अन-नववी (रहिमहुल्लाह) म्हणतात: जबरदस्तीने त्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्याचा पाप माफ केला जातो, पण हत्या करणे जबरदस्तीने बरोबर नाही. बहुसंख्य विद्वानांच्या मतानुसार, जो व्यक्ती जबरदस्तीने हत्या करण्यास सांगितले गेले, तो त्या कृत्यासाठी पापी ठरेल.
इब्न हजर म्हणतात: आणि इतर काही विद्वान म्हणाले की जर एखादी फौज किंवा गट इमाम (किंवा जमातीच्या नेत्याच्या) विरुद्ध बागी होते आणि त्याने त्याच्यावर असलेली जबाबदारी नाकारून युद्ध सुरू केले तर त्याच्याशी युद्ध करणे आवश्यक आहे. तसेच जर दोन गट लढतील तर प्रत्येक सक्षम व्यक्तीवर हे बंधन आहे की तो चुक करणाऱ्याचा हात रोखावा आणि सत्याच्या बाजूने उभा राहावा — आणि हे बहुसंख्यांचे मत आहे. काहींनी वेगळे मत मांडले आणि सांगितले: जे काही युद्ध दोन मुसलमान गटांदरम्यान होते आणि तिथे जमात किंवा इमाम नाही, तेव्हा ते युद्ध त्या परिस्थितीत वर्ज्य आहे, आणि या बाबतील व इतर ठिकाणी आलेल्या हदीस त्याच नियमावर लागू होतात.
अन‑नववी म्हणतात: विद्वानांनी फितन्यांविषयी मतभेद केले आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की मुसलमानांमध्ये झालेल्या फितन्यांमध्ये लढाई करायला नको; अगदी एखादा त्यांच्या घरात घुसून त्यांना मारण्याची मागणी करेल तरीही स्वतःचे संरक्षण करण्यासही परवानगी नाही—कारण त्या मागणाऱ्याला 'मतावल' समजले जाते (म्हणजे त्याची निती किंवा स्थिती संशयग्रस्त/चुकीची समजली जाईल). हा मत अबू बकरा (र.अ.) आणि काहींना आहे. इब्न उमर, इमरान बिन अल‑हुसैन (र.अ.) व काहींनी सांगितले की या फितन्यांमध्ये प्रवेश करू नये; परंतु स्वतःचे रक्षण करण्याचा हेतू असेल तर तो वेगळा आहे—या दोन मते इथे सर्वसामान्यपणे फितन्यांमध्ये सहभागी न होण्यावर एकमत आहेत. पण बऱ्याच सहाबा, ताबिईन आणि इस्लामिक विद्वानांमते फितन्यात सत्याच्या बाजूची मदत करणे आवश्यक आहे، आणि अत्याचारीविरुद्ध उभे राहून त्यांच्याशी लढणे बंधनकारक आहे—जसे अल्लाहने कहा आहे: {فَقَاتِلُوا الَّتِي تَبْغِي...}. हेच योग्य आणि सही मत मानले गेले आहे. तसेच, काही हदीसान्चा अर्थ अशा परिस्थितींवर लागू केला जातो जिथे सत्य स्पष्ट नाही किंवा जिथे दोन्ही बाजू अन्यायी असतील; अशा प्रसंगी त्या हदीसांचे विशेष अर्थ लागू होतात.

Attribution

[رواه مسلم]

Categories

Share

Share hadeeth

Sharing options · 0 Total shares

Share

← Back to encyclopedia
Shopping Basket

Loading...